काटी : उमाजी गायकवाड
राज्य सरकारने 15 ऑक्टोंबर पासून आठवडी बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतने रविवार दि. 18 रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आदेश कोळी यांनी गावातील प्रमुख मंडळीसह ग्रामस्थांची आढावा बैठक घेऊन सर्वानुमते शासकीय नियमांच्या अधीन राहून मंगळवार दि. 20 पासून आठवडी बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला आठवडी बाजार सुरु होणार आहे.
काटी येथील आठवडी बाजारासाठी परिसरातील जवळपास बारा गावांचा संपर्क येतो. सात महिन्यांनंतर सुरु होणाऱ्या या आठवडी बाजारात व्यापारी व नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून शारीरिक अंतराचे पालन करणे, नियमित सॅनिटायझेशन करणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत. मास्क न घालता मोटारसायकलवर प्रवेश केला शंभर रुपये, व फोर व्हिलरने प्रवेश केला तर चारशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या बैठकीला सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रदीप सोळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, अनिल बनसोडे, नामदेव काळे, सुहास साळुंके, माजी सैनिक श्रीकांत गाटे, करीम बेग, दत्ता गाटे, अहमद पठाण, मोहन शिंदे, अविनाश देशमुख, अमर देशमुख आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.