उस्मानाबाद, दि. 18 : मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील काटगाव व आपसिंगा या दोन गावाना मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे हे भेट देवून नुकसानीची पाहणी करणार आहेत.

चार दिवसापुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापुर तालुक्यात मोठे थैमान घातले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोडांशी आलेल्या सोयाबीन खरीपाचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे. तर पीकही गेले आणि शेतातील मातीही वाहुन गेली. त्यामुळे नुकसान होवून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पिकासह अनेक घरांची पडझड झाली असून काही कुटूंबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यांचेही नुकसान झाले आहे. 

निसर्गाच्या भयंकर चक्रामुळे शेतक-याकडून नुकसानीपोटी मदतीची अपेक्षा होत असल्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मंगळवार दि. 20 ऑक्टोबर उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहे. 

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सकाळी 09:15 वा. सोलापूर शासकीय विश्रामगृहात आगमन. त्यानंतर सकाळी 09:30 वा. सोलापूर येथून तुळजापुर कडे प्रयाण, सकाळी 10.15 वाजता काटगाव ता. तुळजापूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी, शेती नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी 11.15 वाजता आपसिंगा येथील पडझड झालेल्या घरासह शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी व शेतक-यांशी हितगुज करणार आहेत. या दोन्ही गावाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे तुळजापुर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेणार आहेत.

 
Top