तुळजापुर : कुमार नाईकवाडी

चार दिवसापुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापुर तालुक्यात मोठे थैमान घातले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोडांशी आलेल्या सोयाबीन खरीपाचा घास अतिवृष्टीने हिरावल्यामुळे माजी केंद्रीय कृषीमंञी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे रविार दि. १८ रविवार रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते.

रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापुर येथील नळदुर्ग रोडवरील हँलीपँड येथे हेलीकाँप्टरने तुळजापुरात शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी शरद पवार यांचे स्वागत खासदार ओमराजे निबांळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, तुळजापुरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी आमदार राहुल मोटे, जिवनराव गोरे, संजय निबांळकर, नगरसेवक अमित शिंदे, संपतराव डोके, प्रतापसिंह पाटील, रा.काँ. युवक प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख, रा.काँ. युवतीच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, रा.काँ. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, शहर अध्यक्ष अमर चोपदार, गणेश नन्नवरे, युवक शहर अध्यक्ष शरद जगदाळे, संदीप गंगणे आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.

तुळजापुरहुन थेट मोटारीने अतिवृष्टी झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीच्या पहाणीसाठी तुळजापुर तालुक्यातील काक्रंबावाडी या भागात जाणार होते. माञ काक्रंबा गावाजवळ असलेल्या कांक्रबा शिवारातील सोपान माळी, सचिन माळी, शहाजी रोचकरी, अच्युत माळी, लक्ष्मण साठे आदीसह शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. पवार यांचा काक्रंबावाडी गावाचा होता. मात्र काक्रंबा गावाजवळील शिवारात असलेल्या रस्त्यावर पुलावरुन उभे राहुन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसान झालेल्या शेती पिकाची माहिती दिली.

यावेळी शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी पुढाऱ्यांना बाजुला सारुन बळीराजा शेतकऱ्यांना थेट प्रश्न विचारला. या वेळी शेतकऱ्यांनी टाहो फोडला. एकतर संसर्गजन्य कोरोनामुळे आम्हांला मोठा ञास सहन करावा लागला. पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे आमंच्या शेतातील पिकाचा हातातोडांशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपे मुळे हिरावून नेला. अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला तात्काळ मदत दिली पाहिजे, असे यावेळी शेतक-यांनी खा. पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. 

यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, तलाठी, ग्रामसेवक सरंपच आदीसह काक्रंबा शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार हे काक्रंबा येथुन उमरगा तालुक्यातील सास्तुर आदीसह गावाकडे रवाना झाले.


 
Top