तुळजापूर : कुमार नाईकवाडी

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार कर्नाटकची निर्मिती झाली आणि अन्यायाने मराठी भाषिक बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा भाग या राज्याला जोडला गेला. याचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर या दिवशी सीमावासीय काळा दिवस पाळतात. मराठी बांधवाच्या समर्थनात कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दि.१ नोव्हेंबर रविवारी  काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते बबन गावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, महेश चोपदार, संदीप गंगणे, व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,  गणेश  नन्नवरे, नितीन रोचकरी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तौफिक शेख, विद्यार्थी शहराध्यक्ष समर्थ पैलवान, अनमोल शिंदे, आदित्य शेटे, राजू भोरे, इंद्रजित सुरवसे, मयूर झिंगाडे उपस्थित होते.

 
Top