नळदुर्ग, दि. 02 : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्याचा वसा हाती घेऊन शिवविचार आणि समाजकार्य मोठया उपक्रमामधून पार पाडत असलेल्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भर यंदाच्या दिवाळी मुहूर्तावर राज्यस्तरीय गडकिल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा लहान गट (८ ते १५) आणि मोठा गट (१५ ते २५ ) करिता आहे.
समाजात ऐतिहासिक वारसा हा परंपरेने चालू रहावा आणि लहानमोठ्याच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दि. ५ ते दि. २० नोव्हेंबर पर्यंत असून याची नाव नोंदणी चालू झाली आहे.
स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी करण्यासाठी मुंबई विभागासाठी जितेंद्र तेलवणे 7738121278, पुणे विभाग हरिदास भिसे 8605778857, कोकण विभाग रुपेश मोकल 8356037764, पश्चिम महाराष्ट्र विभाग कृष्णा पाटील 8830838035,उ त्तर महाराष्ट्र विभाग कुणाल पाटील 8788907293, विदर्भ व मराठवाडा विभागासाठी ज्ञानेश्वर काळे 9763851003 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निलेश जगदाळे यांच्यासह संयोजक वर्गाने केली आहे.