तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील ञिमुर्ती मंगल कार्यालयात मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी रा.काँ. चे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, सरचिटणीस नितीन बागल, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त आहे. त्यांच्या मदतीसाठी युवकांनी पुढे यावे, राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य करावे, तसेच सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करावी, पक्षाच्या पदांचा वापर लोकहिताकरिता करावा. अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचबरोबर तालुका व शहरांत बूथ कमिटी स्थापन करणे, गट व गण प्रमुख यांची निवड करणे, पक्षाच्या विविध सेल मध्ये काम करू इच्छित असणाऱ्या कार्यकर्त्याची नियुक्ती करणे, पदवीधर निवडणूक या विषयावर चर्चा करण्यात आली. एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर कधीच अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
तसेच शरद पवार नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर आले असता त्यावेळी पवार यांनी युवकांना मार्गदर्शनासाठी मी स्वतः येणार आहे असे सांगितले. त्या अनुषंगाने युवकांच्या बैठका घेऊन युवकाना एकत्रित करून, बूथ कमिटी स्थापन करण्यात येणार आहेत. आगामी कांही दिवसात शरद पवार हे स्वतः युवकांचा मेळावा घेणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी पक्षाची एकजुटीने काम करुन राष्ट्रवादी बळकट करावी. असा सल्लाही प्रमुख मान्यवरानी दिला.
सदरील आढावा बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, रा.काँ.चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, माजी नगरसेवक गणेश कदम, रा.काँ.चे सामाजिक न्याय प्रदेश सचिव अशोक जाधव, ॲड. अमोल पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक शहर अध्यक्ष शरद जगदाळे, रा.काँ.विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, अल्पसंख्याक शहराध्यक्ष तौफीक शेख, संदीप गंगणे, गणेश नन्नवरे, बाळासाहेब चिखलकर, बबन गावडे, नितीन रोचकरी, मकसुद शेख, चैतन्य शिंदे, समर्थ पैलवान, धनजंय पाटील, विजय सरडे, विकी घुगे, खंडू जाधव आदीसह रा.काँ.चे तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.