जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मुंबई ते हैद्राबाद जाणाऱ्या पर्यावरण समतोल व मानवाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोरोनासारख्या जागतिक महामारी संकटामुळे माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी व सकारात्मक विचार यावे. या व अशा अनेक हेतूसाठी मुंबई ते हैदराबाद असा प्रवास डॉक्टर, साहित्य, कला, उदयोग, व्यवसाय क्षेत्रातील ११ जणांची टीम सायकलने दररोज १५० कि.मी. याप्रमाणे ७३० कि.मी.५ दिवस मुंबई ते हैदराबाद सायकलने प्रवास करत आहेत.
या टिम मध्ये डॉ.इटकर, प्रसिद्ध बालरोग तज्ञ किरण शेट्टी, सुधाकर वर्मा, रमेश पलाटे, गिरीश राव, आनंद जाधव, नरेश देवकर, सुनील रोहणे यांना जळकोट येथे भेट दिली असता सतिश माळी, बालाजी पाठक, डी .डी .कदम, शिवाजी सुरवसे, मेघराज किलजे, सिध्देश्वर कुंभार, डॉ.गायकवाड, डॉ. सातपुते, मनोज चौधरी, सचिन कदम, श्रध्दांनंद स्वामी, दिनकर कलाल, बालाजी माळी, हणमंत जाधव, संतोष जाधव, धनराज रेणुके, सचिन जाधव यांनी या मानवतावादी सायकलस्वारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.