मुरुम, दि. 24 : टिळक चौक येथील रहिवाशी कै.काशीनाथ सायबण्णा पाताळे यांचे गुरूवारी दि. २४) रोजी राहत्या घरी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. ते मनमिळावू, सुस्वभावी व्यक्तीमत्वाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या वरती त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये गुरूवार (दि. २४) रोजी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.