उस्मानाबाद, दि. 07 : उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाज प्रतिनिधीक स्वरुपात एकत्र येवुन दि. ०६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी मशिद उद्धवस्त घटनेचा निषेध करून या प्रकरणी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. याप्रकरणी दोषी आरोपींवर कोर्टात अपील करून कठोर शिक्षा द्यावी, अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणांचा विशेष कायदा करण्याची मागणी ही करण्यात आली.
निवेदनावर शेख मसुद, सय्यद खलील, पठाण मोईनोद्दीन, पठाण वाजीद, मुखतार शेख, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, शेख हाफिज, शेख अनवर, अॅड. जावेद काजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.