उस्मानाबाद,दि.२३ 
नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.

     देशभक्त,थोर क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशहितासाठी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे योगदान दिले.सामाजिक प्रश्नावर सातत्याने त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले.

 या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

       यावेळी कृषी पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.ए.बी. मोहरे यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जयंती कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top