उस्मानाबाद,दि.२९ :
कोविड- 19 लॉकडाऊन काळातही अनेक लोक गौण कारणास्तव, विनाकारण रस्त्याने वाहने घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा, जरब बसावी या उद्देशाने महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान पोलीस नाकाबंदी केली जात असुन मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान दि. 28 मे रोजी सर्व पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखा यांनी एकुण 498 कारवाया केल्या असुन त्यातून 1,09,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ नियम भंग करणाऱ्यांकडून वसुल केले आहे.