उस्मानाबाद ,दि.७
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढल्याने रूग्ण संख्या वाढली, मृत्यूदरही वाढल्याने शनिवार दि. 8 मे पासून ते गुरूवार दि. 13 मे पर्यंत असे सहा दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज दिले आहे.
उस्मानाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने शहरात कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली होती.
कडक लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच संघटनांनी देखील कडक लॉकडाऊनची मागणी केली होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे.