तुळजापूर, दि. ३ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापुरात नगरपरिषदेच्या वतीने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर देखील खबरदारीचे उपाय म्हणून आणि तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना चालू ठेवल्या आहेत, मात्र शहरातील चौका-चौकात आणि रहिवाशी वस्तीच्या ठिकाणी रिकामटेकड्या लोकांची गर्दी दिसुन येत आहे. या रिकामटेकड्या बिन कामे लोकांच्या गर्दीमध्ये प्रतिष्ठित मान्यवर देखील असल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने सकाळी अकरा वाजेपर्यंत बाजारपेठ जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे सुरू आहेत. अकरानंतर दुकानदारांनी दुकान चालू ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र ही कारवाई करीत असताना गोरगरीब व्यापाऱ्यावर अन्याय आणि बड्या व्यापा- याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेत असल्याची तक्रार आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करताना सर्वांना समान पद्धतीने कारवाई करावी अशी अपेक्षा लोकातून व्यक्त होत आहे.
याशिवाय नगरपरिषदेने आपले तपासणी पथक वेगवेगळ्या भागात तैनात केल्यामुळे व्यापारी वर्ग नियमांचे पालन करीत आहेत. पालिकेचे कर्मचारी यासंदर्भात व्यापा-याना योग्य ते निर्देश देत आहेत. यादरम्यान दुकाने बंद झाली तरी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशेषता चौक परिसरात बिनकामी आणि रिकामटेकड्या लोकांची गर्दी कायम आहे. या लोकांमुळे व्यवहारासाठी बाहेर येणाऱ्या लोकांना या परिसरात गर्दी असल्याचे दिसुन येतो. मोटर सायकलची गर्दी व निष्कारण चर्चा करत बसणा-याची गर्दी, यावर कारवाई करण्यासाठी कळीचा मुद्दा म्हणजे या लोकांमध्ये शहरातील प्रतिष्ठित लोक बसलेले असतात, त्यामुळे कारवाई करणे होत नाही.
रिकामटेकड्या लोकांची गर्दी कमी झाल्यास चौक, परिसर मोजक्या लोकांच्या गर्दीत व्यवहार करू शकेल. परंतु शहराच्या सर्व भागात विशेषत तरुण वर्ग आपण व आपली मोटार सायकल घेऊन शहरात गर्दी करून संचार बंदीच्या आदेशाला हरताळ फासत आहेत.
सज्जन गायकवाड, नगर परिषद पथक प्रमुख
नगरपरिषदेच्या वतीने कारवाई करताना सर्वांना एक समान नियम लावून कारवाई केली जात आहे