काटी , दि . १८ उमाजी गायकवाड

 भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने   अंपग शेतकऱ्यास पाठीमागुन जोराची धडक देवुन झालेल्या आपघातात शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सोलापुर - तुळजापुर महामार्गावर सांगवी ( काटी ) शिवारात शनिवार दि.17 रोजी सकाळी पावणेआठ वाजता घडली.


   तुळजापुर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील विठ्ठल ज्योतीबा मगर वय ६५ हे सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून स्व:ताच्या शेतातील हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी साडेसात वाजता देवपुजा करण्यासाठी जात असताना सोलापुरहून तुळजापुरकडे जाणाऱ्या- चारचाकी वाहनाने अंपग शेतकऱ्यास पाठीमागुन जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात अपंग शेतकरी विठ्ठल जोतिबा मगर वय (65) वर्ष यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहीती कळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे साहय्यक  पोलिस निरीक्षक  सचिन पंडीत, संजय राठोड यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी 1 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपंग शेतकऱ्यास धडक देऊन पसार झालेल्या कारचा शोध तामलवाडी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन लागला असून हि कार इचलकरंजी येथील असून लातूर जवळ या कारला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.  मयत शेतकरी विठ्ठल मगर याच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली सुना नातवडे असा परिवार आहे.
 
Top