उस्मानाबाद , दि . ५
महाराष्ट्र ऑर्गनाईझेश फॉर राईटस ऑफ ह्यूमन (आफ्रोह) संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवार दि. ५ जुलै रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली .
यापूर्वी शासनास समाज बांधव व कर्मचारी बांधवावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देण्यात आली होती. शासनाने अद्यापपर्यंत मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने राज्यव्यापी साखळी उपोषण करण्यात येत आहे. मागण्या मान्य होई पर्यंत जिल्हा शाखेचे पदाधिकारी व समाज बांधव साखळी उपोषण करणार असुन.
राज्यात व जिल्ह्यात कोविड साथ रोगामुळे 144 कलम लागु असून संचारबंदी, जमावबंदी, लागु आहे. अनुचित घटना घडाण्यापुर्वी शासनाने संघटनेच्या विविध मागणीचा विचार करुन तोडगा काढण्यासाठी संबंधिताची बैठक बोलवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या -
शासन निर्णय दि. 21 डिसेंबर 2019 मधील परिच्छेद 4.1 रद्द करावा व मुद्दा 4.2 ची अंमलबजावणी करावी, 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यावरही अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासकिय शिस्त भंगाची कारवाई करावी.
16 महिने होऊनही आधीसंख्य सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेंशन व इतर आर्थिक लाभ देण्यात यावेत. आदीसंख्य सेवेत असलेल्या कर्मचा-याची थांबवलेली वार्षिक वेतन वाढ द्यावी. व सेवा आंतर्गत सर्व लाभ देण्यात यावे. थांबवलेल्या पदोन्वत्ती विनाअट कराव्यात, मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पेंशन व सर्व लाभ देण्यात यावे. कुटूंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा 7 मे 2021 चा शासननिर्णय रद्द करावा यासह अनेक मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंतकुमार घाटेराव, उपाध्यक्ष विजय माकुवार, डॉ. बोईनवाड नागवराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.