वागदरी , दि . एस.के.गायकवाड
कोव्हीड-१९ कोरोना विषाणूची लागण होऊन पतिचा मृत्यु झाल्याने विधवा झालेल्या महिलांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे, त्यांचे व त्यांच्या मुलांची नावे पतीच्या प्रापर्टीमध्ये नोंद करावीत आशा विविध मागण्याचे निवेदन उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आले.
कोव्हीड-१९ मुळे विधवा झालेल्या महिलासाठी राज्य शासनाने धोरण जाहीर करावे या मागणीसाठी दि.२९जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकप्रतिष्ठाणच्या संस्थापिका डॉ.स्मिता शहापूरकर ,परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारूती बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याना कोव्हिड-१९ मुळे विधवा झालेल्या महिलांची शासनाने त्वरित व्यवस्था करावी, सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ त्याना देण्यात यावा, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करावी व त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था करावी असा एकून १३ मागण्याचे लेखी निवेदन जिल्ह्यातील दहा संस्थानी मिळून दिले आहे.
यावेळी संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा (तुळ) चे तानाजी जाधव, शामनाथ संस्था भुमचे सर्जेराव इंदलकर,अँड.मनीषा पाटील कळंब, अँड.जी.बी.वाघे उस्मानाबाद ,सुधाकर बुकं उस्मानाबाद, संजीव आगळे उस्मानाबाद ,मंजुषा शिंदे, तानाजी शिंदे बसवंतवाडी, इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते . जिल्हाधिकारी यांनी या विषयावर त्वरित लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन या प्रसंगी दिले. उस्मानाबाद व बिड जिल्ह्यात मिळून जवळपास 1000 विधवांची नोंद झालेली आहे असेही त्यांनी सांगितले