नळदुर्ग , दि . २६ :
गेल्या महिन्यात पावसाने सर्वञ हाहाकार उडविला. मुसळधार पावसामुळे आचानक पुर येवुन गंभीर परस्थिती निर्माण झाली आसताना
नळदुर्गचे जावाई गफार जमिल शेख रा. महाड जि.रायगड यानी जीव धोक्यात घालुन राञभर पाण्यातुन २२ लोकाचे प्राण वाचविले. या उल्लेखनीय व गौरवास्पद कार्याची दखल घेवुन शेख यांचा नळदुर्ग शहरात भव्य सत्कार करुन गौरविण्यात आले.
दि .२२ व २३ जुलै रोजी महाड शहरात अतिवृष्टी झाली होती. त्यात प्रचंड जिवित व वित्त हानी झाली.सरेकर आळी या भागात २२ लोक पूरात अडकले होते.यावेळी स्वतःच्या जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून संध्याकाळी ७.३० वाजता पाण्यात गेले ते पहाटे ३.३०.पर्यन्त एकूण २२ लोकांचे प्राण वाचविले आहे. अत्यंत धाडसी काम केले आहे. त्यांच्या या कामाची विविध वृत्तवाहिनीने दखल घेतली आहे. बुधवार रोजी ते नळदुर्ग शहरात आले असता दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड व अजहर शेख यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर चव्हाण ,राष्ट्रवादीचे बशीर शेख , परिवर्तनचे मारुती बनसोडे , रिपाईचे अरुण लोखंडे , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे ,बाबूराव बनसोडे , पोलिस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी , हाजी मस्तान शेख , अन्वर शेख ,पिन्टू लोंढे तालुका उपाध्यक्ष ,भाजपाचे श्रमिक पोतदार (जिल्हा सचिव) , विशाल डूकरे , पत्रकार आयुब शेख ,गणेश बनसोडे , आंबादास पवार ,संतोष कलशेट्टी इत्यादि उपस्थित होते.