तुळजापूर दि ६ :

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटला आहे त्यानंतर या प्रश्नाच्या अनुषंगाने सद्यस्थितीचे अवलोकन करण्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा मराठा क्रांती ठोक मोर्चा ची चिंतन बैठक तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक सज्जन साळुंके यांनी दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.


केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या दरम्यानच्या प्रसंगामुळे मराठा आरक्षण प्रश्न अद्याप सुटलेला नाही, आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा ही बैठक अखिल भारतीय छावा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्रामसंघटना,  छावा क्रांतिवीर सेना, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, तसेच मराठा समाजातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी पंचायत समिती, पदाधिकारी व सदस्य ग्रामीण भागातील विविध सरपंच, उपसरपंच,सदस्य, डॉक्टर संघटना, वकीलसंघटना,  शिक्षक संघटना,  इंजिनीयर संघटना, मराठा कर्मचारी संघटना आदी संघटना आणि पदाधिकारी या चिंतन बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर आपले मत मांडणार आहेत .



आमदार व खासदार यांची याबाबतची भूमिका येथे चर्चिली जाणार आहे. यामधून समाजाचे आरक्षण लवकरात लवकर मिळवण्याच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये महत्त्वाची निर्णय होणार आहेत अशी माहिती राज्य समन्वयक सज्जन साळुंके, जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, प्रशांत अपराध, महेश गवळी, अजय साळुंखे यांनी केले आहे.
 
Top