ताज्या घडामोडी



लातूर , दि . १७ : 

एका विशिष्ट वर्गातील लोक पोतराज प्रथेच्या अंधश्रद्धेमुळे, अज्ञानामुळे संगणकाऐवजी हातात आसूड घेऊन अनिष्ट प्रथांचे उदात्तीकरण करत फिरतात. त्यांना या प्रथेतून मुक्त करून सामाजिक, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे म्हणून तुळजापुरात 1996 साली पोतराज प्रथा निर्मूलन परिषद घेण्यात आली

  त्यानंतर फक्त चळवळ करून न थांबता विधायक व रचनात्मक काम यापुढेही सातत्याने करता यावे म्हणून परिवर्तन सामाजिक संस्थेची निर्मिती झाली. गेल्या 25 वर्षांपासून ही संस्था अविरत सामाजिक क्षेत्रात विधायक आणि रचनात्मक काम करत आहे. अशी माहीती संस्थाचालक मारुती बनसोडे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.


परिवर्तन संस्थेने आजपर्यंत क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, जनजागृती अभियान - सप्ताह इत्यादी उपक्रम राबवले आहेत. असे उपक्रम घेऊन विद्यार्थी - युवकात जनजागृती केली व सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग वाढवला.


हुंडा पध्दतीचा उगम रूढ होण्याची कारणे, बंदीसाठी उपाय - एक अभ्यास, स्मानाबाद जिल्ह्यातील पोतराज प्रथा समस्या व उपाय - एक अभ्यास.  या दोन विषयांवर संशोधन आणि अहवाल सादर केले आहेत. 152 पोतराजांचे मतपरिवर्तन करून पोतराज प्रथेतून मुक्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. , असेही मारोती बनसोडे यांनी सांगितले. 


या शिवाय  रमाई महिला सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत अनुसूचित जातीतील महिलांचे बचत गट तयार केले, प्रशिक्षण देण्यात आले, जाणीवजागृती, बँकेत खाते काढणे इत्यादी कामे करण्यात आली. 25 गावात 25 बचत गट तयार करण्यात आले, एकूण 250 महिलांचा सहभाग होता. एकूण 30 गावात 50 बचत गट स्थापन करण्यात आले, यामध्ये 500 महिलांचा समावेश होता.


बचत गट तयार करणे, बँकेत महिलांचे खाते काढून देणे, महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला आर्थिक साक्षर झाल्या. तसेच
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यक्रम
जनजागृती, वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेले आहेत, जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत 6 गावातील 10,000 लोकांपर्यंत पोहोचले. लोकांना जलस्वराज्य प्रकल्पात सहभागी करून घेणे त्यासाठी जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, सहली क्षेत्रभेटी. असे उपक्रम राबवले आहेत. संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या कामात लोकांचा सहभागही वाढत आहे. सामाजिक परिवर्तनाचे अखंड काम सुरूच राहील व समाज बदलाच्या कार्यात आपले योगदान देत राहील, असे मारुती बनसोडे यांनी म्हटले आहे.
 
Top