नळदुर्ग , दि . १२
नळदुर्ग शहराला दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले असून येथील शासकीय विश्रामगृह हे मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत आहे. माञ गेल्या कांही वर्षापासून हे विश्रामगृह धूळखात पडले आहे . या विश्रामगृहात काटेरी झाडे - झुडपे वाढलेले असुन इमारतीची दुरावस्था झाली आहे.अस्वच्छ परिसर व देखभाल होत नसल्याने विश्रामगृह इतिहास जमा होईल का अशी भीती वाटत आहे?
शहरात ऐतिहासिक किल्ला,श्री खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान, नानिमाँ दर्गाह,आदि प्रसिद्ध देवस्थाने व पर्यटन स्थळे आहेत.या शिवाय अणदूर,तूळजापुर, अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणारे व लांब पल्याच्या प्रवासातुन आलेले भाविक यांना हेच एकमेव ठिकाण विश्रांतीसाठी आहे. त्यामुळे शहरात दाखल होणारे भाविक व पर्यटक यांना हे विश्रामगृह सोयीचे असून ते सद्या बंद अवस्थेत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे हे विश्रामगृह पूर्वीप्रमाणे सुरु करून त्याची दुरुस्ती व देखभाल करून भाविक व पर्यटकासाठी सोय करावी,अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे . निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्ष-या आहेत.