काटी ,दि.२०
तुळजापुर तालुक्यातील काटी येथे निसर्ग काव्यमंच समुहाचे तीसरे ग्रामीण काव्यसंमेलन हे दि.२३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बाजार चौक येथे होणार आहे.या संमेलनाचे अध्यक्ष समाधान शिकेतोड प्रसिध्द साहित्यीक तथा बालकवी हे आहेत.तर संमेलनाचे उदघाटन निलेश भुजबळ कासार परभणी हे करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन आनंद कंदले हे उपस्थित राहणार आहेत.तरी या काव्य संमेलनात कवींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहुन आनंद लुटावा असे आवाहान आयोजक पंकज राजेंद्र कासार काटकर यांनी केले आहे.
सुप्रसिध्द वक्ते,साहित्यीक तथा शिक्षक कवी पंकज राजेंद्र कासार काटकर यांनी निसर्ग काव्यमंच समुहाची स्थापना केली असुन यापुर्वी सोलापुर येथे राज्यस्तरिय असे काव्यसंमेलन त्यांनी यशस्वी करुन दाखवले आहे.ग्रामीण काव्य संमेलनाचे दरवर्षी ते आयोजन करत असतात..यावर्षी ग्रामीण कवी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.
या संमेलनासाठी अभिमान हंगरकर पत्रकार यांच्या कडुन कै.सुर्यभान हंगरकर यांच्या स्मरणार्थ रुक्मिणी फाऊंडेशन तर्फे सन्मानचिन्ह दिले जाणार आहेत.तसेच उपसरपंच सुजित हंगरकर यांनी ही अर्थिक सहयोग संमेलनाला दिला आहे.संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील राजेंद्र कासार काटकर, केशव कासार काटकर,दयानंद जवळगावकर,हर्षवर्धन माळी, अनिल हंगरकर,बापु काळे तथा सोमनाथ जामगावकर हे परिश्रम घेत आहेत..