जळकोट,दि.१७: मेघराज किलजे:
जीवन जगण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या साहित्य वाचनांची सध्या गरज असून प्रत्येक आणि त्यांचे साहित्य वचन वाचावे. असे विचार अणदूर येथील जव्हार महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी जळकोट ता. तुळजापूर येथे व्यक्त केले.
जळकोट येथील समर्थ क्लासेस व श्री कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समर्थ क्लासेसच्या सभागृहात महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचा महामेरू या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. बिराजदार हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाभवानी कारखाना व कुलस्वामिनी सूत गिरणीचे संस्थापक संचालक, माजी सरपंच बंकटराव कदम हे होते.
प्रथमतः महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा श्री कॉम्प्युटर्सचे संचालक लक्ष्मीकांत पाटील व रामशेट्टी पाटील यांनी सत्कार केला. प्रास्ताविकात समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, ॲड . आशिष सोनटक्के ,अणदूरचे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार,डॉ. हरिदास मुंडे, सचिन ढेपे उपस्थित होते.
डॉ. बिराजदार पुढे म्हणाले की, बाराव्या शतकात अनुभव मंडपात सर्व जाती धर्मांना एकत्रित आणून समाजपरिवर्तन करणे हे खूप अवघड होते. महात्मा बसवेश्वर संन्यास घेण्यासाठी निघाले असताना, त्यांच्या मनामध्ये मी गेलो तर समाजाचे कसे होईल. या विचाराने मनामध्ये परिवर्तन होऊन समाजकार्याला सुरुवात केली. अंधश्रद्धा, द्वेषभावना यातून समाजाला बाहेर काढून लोकशाहीची बीजे रोवली. आजच्या घडीला त्यांच्या वचनांचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, महेश कदम, कृष्णात मोरे, बसवराज कवठे, अनिल छत्रे, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम, सुनील कदम, अभिमन्यू कदम, कस्तुरा कारभारी, नितीन माळी, महेश कारले, बाळासाहेब पाटील, मल्लिनाथ नरे, शिवशंकर तिरगुळे , अमोल आलुरे, प्रशांत कारले, प्रशांत पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले.