कळंब, दि . २३
महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन लातूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या सेवानिवृत्त अधी परिसेविका श्रीमती महानंदा बाळासाहेब कोरे यांनी एकल महिलांना मार्गदर्शन करताना केले.
दि.22 मे रोजी पर्याय सामाजिक संस्था, हसेगाव के. येथील सभागृहात आयोजित केलेल्या "वर्तन बदल संवाद" कार्यशाळेत विधवा, परितक्ता, एकल महिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती कोरे या बोलत होत्या, पुढे त्या म्हणाल्या की, महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये, छोटे छोटे आजार अंगावर काढल्यास गंभीर आजारास तोंड द्यावे लागते, त्यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होते, दररोज किमान तीन किलोमीटर चालणे गरजेचे असून त्याने कसल्याही व्याधी होणार नाहीत.
या कार्यशाळेस उपस्थित असलेले श्री. बी. ई. कोरे यांनी असे घडलो आणि मुलांना कसं घडवलं याबाबत मार्गदर्शन केले, यावेळी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अनेक गोष्टीचा त्याग करुन एका मुलीस उपजिल्हाधिकारी तर दुसऱ्या मुलीस विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याचे सांगुन शिक्षणाचे महत्व त्यांनी उपस्थित एकल महिलांना सांगितले, या कार्यशाळेचे आयोजन हॅबीटेट फॉर ह्यूम्यानिटी इंडिया यांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एकल महिला संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती सुनंदा खराटे या होत्या, तर अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. चे शाखा व्यवस्थापक भिकाजी जाधव हे उपस्थित होते, कार्यशाळेच्या दोन्ही सत्राचे प्रस्ताविक आश्रुबा गायकवाड यांनी केले, यावेळी पर्याय चे कार्यकर्ते विकास कुदळे, वैभव चोंदे, बालाजी शेंडगे, बाबासाहेब कोरे, रामलिंग स्वामी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.