तुळजापूर दि २१ :डॉ. सतीश महामुनी


 औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका येथे घडलेल्या मनोज अहवाडच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर चार्जशीट बनवून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालावा आणि तो खटला चालवण्यासाठी अॅड,उज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी, त्या संबंधित आरोपींना फाशी व्हावी सकल मातंग समाजाच्या वतीने तुळजापुरात करण्यात आली


मातंग समाजाला अ ब क ड  वर्गीकरण करून समाजाला आरक्षण मिळावे, तुळजापूर येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यावे त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळा बसवावा. त्या पुतळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा,  मनोज अहवाड घरच्यांना पुनर्वसन करून 25 लाखाची मदत द्यावी,   त्यांच्या अर्धागिनीला शासकीय नोकरी मध्ये समाविष्ट करून घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी दि. २० मे रोजी तुळजापूर तालुक्यातील  सकल मातंग समाज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला 


 सकल मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत असताना महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून बोंबाबोंब आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी विजय शिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा मातंग समाजाकडे असलेले दुर्लक्ष आणि विशेष म्हणजे गृहखात्याचे मातंग समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आला


लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला आपण शासकीय सेवांमध्ये समाविष्ट करून घेत नसाल तर संबंधित प्रशासनाचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला, त्यानंतर आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगीनाताई कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये जर मातंग समाजाच्या प्रश्नांकडे या सरकारने दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा दिला, तुळजापूरचे नगरसेवक किशोर साठे यांनी आपल्या मागणीमध्ये महाराष्ट्र सरकारने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. 


आयोजक कमिटी संबंधित मातंग समाजाचे सर्व पदाधिकारी सोमनाथ कांबळे,  किरण  कांबळे,  दीपक खंदारे, नगर परिषद कर्मचारी युनियन अध्यक्ष योगेश खंदारे व उपस्थित जेष्ठ नेते मंडळी मच्छिंद्र शिरसागर , युवराज जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते
 
Top