नळदुर्ग , दि . २२ विलास येडगे
नळदुर्ग शिवारातील सर्वे नंबर १३९ मध्ये श्रेयस जयपाल पाटील यांच्या शेतजमिनीवर वास्तव्य करून राहत असलेल्या पाटील तांडा खुदावाडी ता.तुळजापूर येथील कुटुंबियांच्या नावे न्यायालयाच्या आदेशानुसार दानपत्र आधारे दोन एकर जमिन नावे करण्याचे न्यायालयाचे आदेश असताना देखील अद्याप संबंधित शेत मालकाने त्यांच्या नावे जमीन करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून येथील ६० कुटुंबीयांनी दि.२ जुन २०२२ रोजी सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे निवेदन उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक
यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की दि. २५ फेब्रुवारी १९८५ रोजी तुळजापुर न्यायालयाने श्रेयश जयपाल पाटील राहणार नळदुर्ग यांचे मालकीचे गट सर्वे नंबर १३९ पैकी दोन एकर जमीन दानपत्र करून पाटील तांड्यातील ग्रामस्थांना देण्याचे आदेश दिले होते. परंतु श्रेयश जयपाल पाटील व त्यांचे कुटुंबीय तांड्यातील ग्रामस्थांना वर्षानुवर्ष सांगत आले की तुमची वसाहत ( तांडा ) वाढत आहे त्यामुळे तुम्हाला पाच एकर जमिन खरेदी करून देतो असे आमिष संबंधित शेतकऱ्यांनी तांड्यातील कुटुंबीयांना दाखवुन तांड्यातील ग्रामस्थांकडुन उघड्यावरील शेणखत दर वर्षी घेतात व काही रोख रक्कम ही घेतल्याचा आरोप नमुद केले आहे. परंतु आजतागायत जमिन नावावर करून देण्याचे ताटकळत ठेवले आहे.
याउलट न्यायालयाचे आदेश असताना ग्रामस्थांच्या परस्पर त्या जमिनी पैकी दोन व्यक्तीना काही जमीन परस्पर खरेदी करून दिले आहेत. याबाबत विचारणा केली असता जेसीपी ने तुमचे घरे उद्ध्वस्त करू अशी दमदाटी देखील संबंधित शेतकरी करीत आसल्याचे म्हटले आहे तसेच नळदुर्ग मधील कांही लोकांनी यातील काही जागेवर अतिक्रमण केलेले आहे असे या निवेदनात सांगितले आहे.
पाटील तांडा ग्रामस्थांचे नावे घर जागेचे मालकी आठ अ ची नक्कल नसल्यामुळे शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून तांड्यातील बेघर कुटुंबीयांना जवळपास ४५ घरकुल मंजुर झालेले आहे. परंतु लाभार्थ्यांच्या नावे घर जागा आठ अ मालकी नसल्याने सदर योजनेपासून तांड्यातील बेघर नागरीक घरकुल योजनेपासुन वंचित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे .
गट नंबर १३९ पैकी दोन लोकांना अर्धा एकर प्रमाणे जी बेकायदेशीर जमीन खरेदी करून दिलेली आहे ते खरेदीखत रद्द करावे व श्रेयस जयपाल पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी तांड्यातील ग्रामस्थांना बोलल्याप्रमाणे पाच एकर जमीन त्वरित खरेदी करून द्यावी. तसेच ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण काढुन सदरील जागा ग्रामस्थांना मोकळी करून द्यावी अन्यथा २ जुन २०२२ रोजी श्रेयश जयपाल पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये तांड्यातील ग्रामस्थानी सामुहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे