मुंबई , दि . ०८

  राज्य निवडणूक आयोगानं 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर निवडणूक जाहीर केली आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. यानुसार २० जुलै पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून १८ ऑगस्ट मतदान, तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

 यामध्ये जळगाव, पुणे, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, बुलढाणा, या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणे करून 5 जुलैला प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ही 20 जुलै अशी ठरविण्यात आली आहे.
तर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 22 जुलै ते 28 जुलै असणार आहे, म्हणजेच या तारखेत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.


यात रविवार असल्यास उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी तीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
अर्जांची छाननी झालेल्या उमेदवारांची यादी ही 29 जुलैला सकाळी अकरा वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


तसेच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 4 ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत अशी दिली आहे.
अर्जावर काही आक्षेप अथवा अपील असल्यास आठ तारखेपर्यंत म्हणजेच 8 ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.


तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात येणार आहे.
18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.


तसेच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची तारीख ही 19 ऑगस्ट शुक्रवार अशी देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून हे निकाल जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे.
 
Top