मुरूम दि.३०,
येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील १९८८-८९ च्या बॅचच्या म्हणजेच तब्बल तेहत्तीस वर्षाने वर्गमित्रांचा स्नेह मेळावा व त्याचबरोबर गुरुजनांचा सत्कार सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूमचे सचिव व्यंकट जाधव, कंटेकुर सरपंच गोविंद पाटील, विविध कार्यकारी सोसायटी मुरूमचे चेअरमन दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, प्राचार्य पी पी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपण आत्मविश्वासाने पार पाडावी, विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करत जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तुमचे-आमचे कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडावे असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले व त्याच बरोबर संस्था उभी करत असतानाच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला, पन्नास वर्षांत काय केलं? असे प्रश्न अनेकजण विचारतात परंतु या पन्नास वर्षात ज्यांनी आपलं आयुष्य उभा केला त्यांचा विचार मात्र आपण करत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी माजी विद्यार्थ्यांचे वतीने आपल्या गुरुजनांचा डी. के. शेळके, जाधव बी एम, हुलसुरे के जी, अंबर एस टी, उंबरे टी एस,वाघमारे डी एन,चव्हाण सी एस सत्कार करून चांदीची विद्याची देवता सरस्वतीचे मूर्ती भेट दिले.
सेवानिवृत्त अंबर एस टी माजी विद्यार्थी मल्लिनाथ स्वामी,डॉ.चंद्रशेखर हंगरगे,राजशेखर मूदकण्णा, चंद्रकांत बडदाळे,डॉ.अनिल वाली आदींनी मनोगतपर बोलताना शाळेतील जुन्या आठवणी ताज्या केल्या, पत्र्याच्या शेड मधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कामाचे अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास शाळेचे इमारतीचे चित्र व झेरॉक्स मशीन भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे प्रास्ताविक मल्लिनाथ स्वामी, तर आभार सचिन शेळके यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलींद पोतदार,महताब नूरसे,विरभद्र जोजन,गुलाब अडके, श्रीशैल मंगरूळे, सुरेश मंगरूळे, हुकूम कौलकर,रियाज इनामदार,सुदर्शन उपाध्य,महादेव कळसे आदींनी परिश्रम घेतले.