जळकोट, दि. १४
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जळकोट ता.तुळजापूर येथुन आझादी गौरव यात्रेची भव्य सुरवात करण्यात आली.
यावेळी सभेस मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील,धिरज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास ,प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,उमरगा तालुका अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे,, जळकोटचे सरपंच अशोक पाटील,माजी ता.अध्यक्ष सिद्राम मुळे, माजी संचालक बंकट कदम , माजी जि.प.सदस्य दिलीप सोमवंशी, गजेंद्र कदम,राजु पाटील,हरिष जाधव, काटे गुरूजी, संजय गुजोटें, सेनापती पाटील, संजय वाघोले, अतुल कलशेट्टी,कल्यानी साखरे,शंकर वाडीकर, श्रीनिवास पाटील,पिंन्टु चुंगे,शिवराम कदम, जीवन कुंभार,पिंन्टु भोगे, शिवराज यादगौडा,लक्ष्मण राठोड, सुर्यकांत राठोड,मोहन चव्हाण,परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार मेघराज किलजे यांनी केले .