नळदुर्ग ,दि. १३
थोर व्यक्तींचे विचार आज देशाला संकटाच्या स्थितीतून बाहेर काढू शकतात, देशाच्या वाटचालीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे.
देशात विविध प्रकारच्या संस्कृती, जाती धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यापूर्वी याठिकाणी बहुसंख्येने संस्थाने होती. या सर्वांना एकत्र करणं खुप अवघड होते. तत्कालीन नेत्यांनी सर्वाना एका झेंड्याखाली आणून या एकसंघ देशाच्या निर्मितीचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी नळदुर्ग येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रेस प्रारंभ झाले आहे. नळदुर्ग येथे शनिवारी या पदयात्रेचे आगमन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
नळदुर्ग येथिल बसवराज धरणे संकुलन समोर झालेल्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बसवराज पाटील हे बोलताना पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात कोणती कामे करायला पाहिजे, याचा पुढील पन्नास वर्षांचा विचार त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू यांनी केलेला होता. शेती आणि उद्योग याकरिता मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार त्यांनी केला. त्यामुळेच आज देशांत कृषी क्रांती आणि औद्योगिक क्रांती घडून आली. त्यांच्यानंतर स्व. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा देऊन देश विकासासाठी मोठे कार्य केले. हा बदल काही एकदोन वर्षात झालेला नाही. यामागे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वीर भगतसिंग यांच्यासह अनेकांचे मोठे योगदान आसल्याचे त्यानी सांगितले .
माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी सन १९७२ चा दुष्काळ , काँग्रेस पक्षाचे विचार , तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ते राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री आदीच्या कार्यकालातील विकास कामाबाबत व गत काळात पक्षाने जनतेसाठी केलेल्या उपाय योजनाबाबत सविस्तर उपस्थिताना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जि.प.सदस्य बाबुराव चव्हाण , प्रकाश चव्हाण , जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश अष्टे , प्रदेश सचिव दिलीप भालेराव , जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील , काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास साळु , तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अख्तर काझी , माजी सभापती शिवाजी गायकवाड , उमरगा काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष राजुळे , सरपंच अशोक पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी , माजी नगरसेवक बसवराज धरणे, शहबाज काझी , विनायक अहंकारी, सचिन डुकरे , सुधीर हजारे , इमाम शेख , विनायक पुदाले , फारुख कुरेशी ,बंडू पुदाले , पांडू पुदाले, संदीप सुरवसे , अजहर जहागिरदार , माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड , माजी नरसेविका सुप्रिया पुराणिक , महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष सुभद्रा मुळे , महिला शहराध्यक्ष कल्पना गायकवाड , संदीप गायकवाड , लक्ष्मण राठोड , अत्ताउर रहेमान कुरेशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक शहबाज काझी , सुञसंचलन माजी नगरसेवक विनायक अहंकारी तर आभार माजी नगरसेवक बसवराज धरणे यानी मानले.