वागदरी, दि.१०: एस.के.गायकवाड :


उस्मानाबाद जिल्ह्यातीत अतिवृष्टीमुळे  खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह अन्य पिके पिवळी पडून व तसेच शंखयूक्त गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे पिके वाया जावून  आर्थिक नुकसान झाले आहे.तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)चे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी तुळजापूर तहसील कार्यालयावर रिपाइंच्या वतीने आयोजित निदर्शने मोर्चाला संबोधित करताना केली.



रिपाइं (आठवले) तुळजापूरच्या वतीने बुधवार दि.१० आँगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,  यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर निदर्शने मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजाभाऊ ओव्हाळ बोलत होते. यावेळी रिपाइंच्या वतीने तहसीलदार तुळजापूर मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना  निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात 
  म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानाग्रस्त शेकऱ्याना हेक्टरी ५०,०००/-रुपये नुकसानभरपाई द्यावी, 
 तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कमाचे भूमिपूजन करून त्वरित बांधकाकामास सुरूवात करावी,तुळजापूरातील आदीशक्ती आदीमाया मातंगी मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग शंभर मिटर करून पुर्वत कायमस्वरूपी खुला करावा,
तीर्थ (बु) ता.तुळजापूर, वडगाव (सिध्देश्वर) व तेर ता.जि.उस्मानाबाद येथील बौद्ध स्तुपावर हिंदू देवदेवतांचे अतिक्रमणे पुरातत्व विभागा मार्फत उत्खनन करून ते बौद्ध स्तूप बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जिल्ह्यातील शासकीय गायरान जमीनवरील अतिक्रमणे कायम करून दलित भूमिहीनांना कसून खाण्यासाठी जमीनीचे पट्टे त्यांच्या नावे कराण्यात यावे,
श्रावण बाळ ,संजय गांधी योजनेतील अनुदान मंजुरीसाठी शासनाने घातलेली २१००० उत्पन्नाची जाचक अट रद्द करण्यात यावी आदी 
 मागण्याचे   निवेदन तहसीलदार याना देण्यात आले.
यावेळी रिपाइंचे  तानाजी कदम बाबासाहेब बनसोडे,  एस.के.गायकवाड,  बाबासाहेब मस्के,  प्रकाश कदम आंदिंची भाषणे झाली.
 

 प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थेट तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. प्रचंड निदर्शने करून तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
 


यावेळी रिपाइंचे आप्पा कदम,सुखदेव पांडागळे,दयानंद कदम,युवक शहराध्यक्ष अमोल कदम,विष्णू सोनवणे, नाशिक कांबळे,शंकर माटे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top