काटी, दि.२९: उमाजी गायकवाड

 काटी ता.तुळजापूर  येथे सोमवार दि. 29 रोजी सकाळी 11:30 वाजता येथील काटी-धामणगाव रोडवर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या तुळजापूर शुगर  प्रा. लि. या गुळ पावडर कारखान्याचे भुमिपुजन विविध मान्यवरांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन दत्ता कुलकर्णी व मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हणमंत मोहेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. काटीसह परिसरातील  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस चिंतेचे कारण ठरत होता. कारखानदार ऊस नेत नसल्याने या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपले ऊसाचे क्षेत्र कमी केले. मागील दोनतीन वर्षांपासून या भागात
पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड.अनिल काळे यांना कारखान्याच्या गाळपासह  शेतकऱ्यांना हक्काच्या अशा ऊसाच्या पिकाकडे वळविण्यासाठी प्रोत्साहित करण्याची  दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे. 
    

यावेळी प्रस्ताविकात तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याविषयी माहिती देताना तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड. अनिल काळे म्हणाले की, येथे साकारण्यात येत असलेल्या तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याची गाळप क्षमता ही दिवसाला एक हजार मे. टनाची असून हंगाम पुर्ण होईपर्यंत दोन लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगून शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना त्यांच्या वाहतुकीसह ऊसाचे पैसे देखील वेळेत देण्यासाठी वचनबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उद्घाटक  सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन दत्ता कुलकर्णी म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांचा ऊस हंगाम निघून गेला तरी शेतातला ऊस कारखान्याला जात नाही. त्यामुळे खचून अनेक शेतकऱ्यांनी आपले शेतातील ऊसाचे क्षेत्र कमी केले. परंतु याच भागातील आमचे मित्र ॲड. अनिल काळे यांनी तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखाना हि संकल्पना पुढे आणत या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या समस्येवर मात करण्यासाठी तुळजापूर शुगर गुळ पावडर कारखान्याच्या माध्यमातून पर्याय निर्माण केला असून त्यासाठी हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच प्रमुख पाहुणे मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन तथा मोहेकर ॲग्रो गुळ पावडर कारखान्याचे चेअरमन हणमंतराव मोहेकर म्हणाले की, या भागातील शेतकरी मोठा झाला पाहिजे हे ध्येय मनात ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासून कारखाना सुरु करावा असे सुचित केले. कुठलाही उद्योग असो त्यासाठी भांडवल गरजेचे असते. त्यात गुळ पावडर तयार करण्याचा प्रकल्प म्हणजे खर्चिक बाब आहे. त्यासाठी कारखाना पुर्णत्वास येईपर्यंत तांत्रिक व आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आम्ही सदैव ॲंड. अनिल काळे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तुळजापूर शुगर गुळ कारखान्याचा शेतकऱ्यांना होणार फायदा

या भागातील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात नसल्याने ऊसाचे क्षेत्र जरी कमी झाले असले तरी या कारखान्यामुळे पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी ऊसाकडे वळतील असा विश्वास देऊन तुळजापूर शुगर गुळ कारखान्याचा  फायदा या भागातील शेतकऱ्यांना नक्की होणार आहे.
    विक्रमसिंह देशमुख ,(ऊस उत्पादक तथा
भाजप जिल्हा उपाध्यक्ष) 

या कार्यक्रमप्रसंगी  भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,  जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, चंद्रकांत कोकाटे, सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, काटीचे सरपंच आदेश कोळी,बाबा काशिद, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे,दत्ता राजमाने, नागेश नाईक, आदित्य काळे, धनाजी धावणे, भिमाशंकर हासुरे, गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, ॲड. पांडुरंग लोमटे, ॲड.राम गरड, ॲड. सुनिता कोकाटे-काळे, ॲड.धाराशिवकर, ॲड.मनोज घोगरे,ॲड. अण्णा बारखडे, संजय पटवारी, सयाजीराव देशमुख, अशोक जाधव, धनाजी गायकवाड, धनंजय देशमुख, दत्ता गाटे, रामेश्वर लाडूळकर, हरिभाऊ काळे, बालाजी काळे, किरण काशिद, सचिन थोरात आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top