चिवरी, दि. ०८ :राजगुरु साखरे: 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर  तिरंगा मोहिमेची जनजागृती रॅली तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी ग्रामपंचायतकडून दि,८ रोजी काढण्यात आली. 


यामध्ये देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या या रॅलीमध्ये  गावातील वयोवृद्ध नागरिकासह तरुणाने  मोठा सहभाग नोंदविला होता. हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य,  ,अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा सेविकासह आदींनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेंतर्गत गावामध्ये ३५० घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे, यावेळी सरपंच स्वाती दूधभाते  उपसरपंच विजय सावंत,  ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील महेश पाटील, माजी उपसरपंच अण्णाराव कदम,  व्यंकटराव सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल वडजे चेअरमन शिवाजी वडजे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.
 
Top