काटी ,दि .१०
तुळजापूर तालुक्यात काटीसह परिसरात मागील आठवडाभरापासून संततधार पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले असून बरीचशी पिके पाण्याखाली आहेत. तर सोयाबीन पिक पिवळे पडल्याचे दिसुन येत आहे.
सततच्या पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी बुधवार दि. 10 रोजी गावातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषी विभाग तसेच महसूल विभागाकडून करण्यात आली. या पहाणीत शिवसेनेचे कार्यकर्ते सयाजी देशमुख, राजेंद्र गाटे,नाबाजी ढगे, गौतम ढगे, कैलास मदने यांच्या उपस्थितीत कृषी विभागातर्फे कृषी सहायक मनोज माळी, तर महसूल विभागातर्फे तलाठी प्रशांत गुळवे यांनी बुधवारी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर लवकरच याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल, असे कृषी सहाय्यक मनोज माळी व तलाठी प्रशांत गुळवे यांनी सांगितले. तसेच उपस्थित असलेले शिवसेनेचे सयाजी देशमुख लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचेकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.