उस्मानाबाद, दि.२० :

  जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे.



 त्यामुळे उस्मानाबाद  जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पीकांचे सततचा पाऊस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता तात्काळ पंचनामे करावे आणि एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, ही दक्षता घ्यावी अशा सुचना खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.   20  रोजी  वाशी तालूक्यातील सरमकुंडी,   तांदळवाडीजवळका, शेंडी, पिंपळगाव (क), हातोला, पारगाव यांसह तालूक्यातील सततच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या गावांतील पाहणी दौऱ्यावेळी प्रशासनाला दिल्या.


 शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी APP वर GPS फोटो व सातबारा अपलोड करावे व सततच्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी. जुलै -  ऑगस्ट मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप हंगाम २०२२ मधील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनउडीदमुगतुर पीकांवर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शंखी गोगलगाय व इतर कृमीजन्य कीडींद्वारा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. 


वाशी तालूक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली खरीप हंगामातील सर्व पीके बाधीत झालेली आहेत. केंद्र शासनाच्या   NDRF आणि राज्य शासनाच्या   SDRF   निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता सदर पंचनामे तात्काळ पुर्ण करून पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबतच्या ही सुचना यावेळी खासदार  राजेनिंबाळकर यानी संबंधीतास दिल्या.

             याप्रसंगी संपर्क प्रमुख शंकर बोरकर जिल्हा प्रमुख गौतम लटके ,     विधानसभा    समन्वयक दिलीप शाळू महाराजतालूका प्रमुख विकास मोळवणेयुवा शहर प्रमुख,  वाशी, लायक तांबोळीशहर प्रमुख अनिल गवारेवाशी बाळासाहेब उंदरेतात्या गायकवाड गट प्रमुखतहसीलदार नरसिंग जाधवतालुका कृषी अधिकारी, संतोष कोयलेगट विकास अधिकारी राजगुरू व शेंदरे उपअभियंता यांच्यासह शेतकरीनागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.      

 
Top