तुळजापूर,दि.०६

 तालुक्यातील मौजे माळुंब्रा येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मानभुमीच्या कामाचे   दि. ६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हास्ते भुमीपूजन करण्यात आले. 

माळुंब्रा गावातील मागासवर्गीय समाजाला  गेली ७५  वर्षापुर्वी पासून ते आजतागायत  स्मशानभूमी नसल्याने समाजातील अंत्यविधी ऊन वारा पावसात, उघड्यावर केले जात होते. परिणामी पार्थिवाची अवहेलना होत होती.  धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या शिफारशीने व शिवसेना (ठाकरे) गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख  शामलताई वडणे पवार यांच्या पाठपुराव्यातुन   जिल्हा नियोजन समितीमधून माळूंब्रा गावच्या मागासवर्गीय समाजाची  स्मशानभूमी  मंजूर  करून घेण्यात आले .यानंतर स्मशानभूमी कामाचे प्रत्यक्षात भुमीपूजन करण्यात आले आहे. यामुळे मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीला आता निवारा मिळणार आहे


याप्रसंगी माजी उपसरपंच रत्नदिप वडणे, नागनाथ सुतार,नानासाहेब वडणे,  धनराज तुळसे, सचिन वडणे, बाळासाहेब वडणे, शाखा अभियंता ढेरे,उमेश आठवले, सुनील वडणे, सचिन पवार, संघर्ष तुळसे, प्रशांत वडणे, राजू तुळसे, सचिन तुळसे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील तुळसे,तंटामुक्त अध्यक्ष गणेश वडणे, आदिंसह गावातील मान्यवर उपस्थित होते.
 
Top