वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात वीज कोसळुन कडब्याची बणीमसह ठिबक सिंचनचे पाईप असे पावणे सहा लाखांचे साहित्य जळुन भस्म 

नळदुर्ग, दि.१६: नवल नाईक 

गुरूवार रोजी रात्री मेघ गर्जनेसह जोरदार वादळीवारे होऊन नळदुर्ग शिवारात पाऊस झाला. यावेळी आचानक एका शेतातील कडब्याच्या बणीमवर विज पडुन कडब्यासह ठिंबक सिंचनचे पाईप असे मिळुन सुमारे पावनेसहा लाख रूपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

नळदुर्ग शहर व परिसरात  दि.15 में रोजी रात्री   जोरदार वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पाऊस  झाला. यावेळी नळदुर्ग शिवरातील शेतकरी मंदाबाई भास्कर पाटील यांच्या शेतामध्ये ज्वारीच्या कडब्याची सहा हजार पेंढयांची बणीम व त्याच्या बाजुला ठिबक सिंचनचे ठेवलेले पाईप व इतर साहित्य् हे आकाशातुन विज पडुन जळुन खाक झाल्याची घटना रात्री  साडेनऊ वाजता घडली आहे. या घटनेत आंदाजे 5 लाख 68 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. शुक्रवार रोजी नळदुर्ग सज्जाचे  ग्राम महसुल अधिकारी विश्वास वायचळ यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवुन मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये  मंदाबाई पाटील या शेतक-यास शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

   
 
Top