विजपुरवठा सुरळीत करा,अन्यथा आंदोलन,मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांचा महावितरणला इशारा 

नळदुर्ग,दि.२५ :

शहरातील महावितरण कार्यालयाच्या मनमानीपणामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत,वारंवार विज पुरवठा खंडीत होत असून याचा सर्वाधिक फटका सर्व सामान्य नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे.

वारंवार विज पुरवठा खंडीत होऊन कमी अधिक दाबाने विज पुरवठा होत असल्याने घरातील विद्युत उपकरणाचे नुकसान होत आहे,विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे,शहरात पाणी दहा दिवसाआड येते पाणी सोडल्याच्या दिवशी विद्युत मोटारीने पाणी भरावे लागते,विज पुरवठा खंडीत झाल्यास त्यावेळी पाणी साठवून ठेवता येत नसल्याने नागरिक त्रस्त होत आहेत,विजे अभावी व्यवसायावरही परिणाम होत आहे,महावितरणने आठवड्यातील एखादा दिवस दुरुस्तीसाठी राखीव ठेवावा व तशी सूचना शहरवासियांना द्यावी,व त्याच बरोबर शहरातील अनेक ठिकाणच्या विजेच्या खांबावर विद्युत तारा जुन्या असून जीर्ण झाल्या आहेत,अनेक ठिकाणी तुटल्या आहेत,तात्पुरती जोडणी केलेली आहे,त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे,त्यामुळे अशा ठिकाणच्या विजेच्या तारा तात्काळ बदलून नव्या तारा टाकण्यात याव्यात व शहरातील विज पुरवठा नियमित व सुरळीत पणे सुरु ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी महावितरणच्या शाखा अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
 
Top