नळदुर्ग :  मुसळधार पावसाने सुमारे  ५४  हेक्टर क्षेत्र नुकसानीचे कृषी विभागाने केले पंचनामा ; सर्वाधिक ३६० मिमी पावसाची झाली नोंद 

 नळदुर्ग,दि.०४:

नळदुर्ग मंडळात  मुसळधार पावसाने सुमारे  ५४  हेक्टर क्षेत्रावरील फळबागासह अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीचे  कृषी विभागाने पंचनामे केल्याची माहिती नळदुर्ग कृषी मंडळ कार्यालयाचे कृषी साहाय्यक योगेश क्षिरसागर यांनी सांगितले.

 नळदुर्ग शहर व परिसरात मे महिन्यात पहिल्यांदाच मान्सून पुर्व   सर्वाधिक ३६० मि मी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी रानात वापसा आलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामा पुर्वी शेतीच्या मशागतीसाठी कामे अजूनही खोळंबली आहेत.  सततच्या पावसामुळे ऊस पिकात मोठ्या प्रमाणावर तणांची वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

नळदुर्ग परिसरात एकवीस दिवस दि.११ ते दि.३० मे रोजी सकाळ पर्यंत एकुण ३६० मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अवेळी झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिके व भाजीपालाचे आतोनात नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे.

मान्सून पूर्व पावसामुळे शेतीचे कामे खोळंबली आहेत.
 पावसामुळे मशगतीची कामे करण्यास शेतकऱ्यास खूप अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.  ऐन वेळे खरीप पेरणीच्या दिवसात अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व मशागतीचे  खर्चही वाढण्याची भीती शेतकऱ्यास वाटत आहे. आगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर हे नवीन निसर्ग निर्मित संकटाचे सावट दिसत आहे. त्यानंतर बी बियाणे खत ह्या सगळ्या मुळे शेतकरी हवालदीला झाला आहे. वेळ कमी व कामे जास्त असल्यामुळे मजुरी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नळदुर्ग मंडळात उडीद ८ हेक्टर, कांदा १५ हे. ,भुईमूग १५ हे.पपई १० हे., आंबा ४ हे.,भाजीपाल ०२ हे असे मिळुन ५४  हे. क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.


 
Top