पांगरी  -  राज्यातील संगणक शिक्षकांवर सूडबुद्धीने कारवाई होऊ न देता येत्या जानेवारीत संगणक शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करून सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन महाराष्ट्रचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले असल्याची माहिती राज्य श्रमिक महासंघाला दिले.राज्यातील हजारो संगणक शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य  मोर्चा काढला होता.
  राज्यात केंद्र शाशन पुरस्कृत आयसीटी योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांना पद निर्मिती करून सेवेत कायम सामावून घेऊन दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंगाच्या वतीने नागपूर विधिमंडळावर मोर्चा काढून हा प्रश्न लावून धरण्यात आला होता.तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत शिस्टमंडळातील कॉ.शरद संसारे,उदय भट,आयसी
टी शिक्षकांचे प्रतिंनिधी प्रवीण डोके,बालाजी उमाटे,प्रशांत पिंपळे यांनी राज्यातील संगणक शिक्षकांच्या प्रलंबित प्रशांनासंदर्भात सविस्तर चर्चा केली.या शिक्षकांना पंजाब सरकार प्रमाणे सेवेत काम सामावून घ्यावे यासाठी समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली.तसेच कंपंनीकडून कर्मचार्‍यांना होत असलेला मानसिक शारीरिक त्रास कमी करावा.कंपन्यांनी शासनाबरोबर केलेल्या कराराप्रमाणे शिक्षकांना वेतन दिले जात नाही.भविष्य निरवाह निधि कपात होत नाही,वेतन चिठी दिली जात नाही,वेतनवाढ दिली जात नाही आदि तक्रारी यावेळी करण्यात आल्या.कोणत्याही कर्मचार्‍यांना काडण्यात आले तर त्यांच्यावर शाशकीय कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
 
Top