नळदुर्ग :-  दीर्घ आजारास कंटाळून एका शेतकर्‍याने शेतातील गोठ्यात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आरळी खुर्द (ता. तुळजापूर) शिवारात शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
                        रेवण विश्वनाथ शिलवंत (वय ६७ वर्ष, रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पंडित शंकर शिलवंत (वय ४३ वर्ष, धंदा शेती रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर) यानी नळदुर्ग पोलिसात खबर दिली. त्याचा चुलत चुलता रेवण यास मुतखड्याचा आजार होता. त्यास कंटाळून शेतातील गोठ्यात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची पोलिसात आकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास इटकळ दूरक्षेत्र पोलीस चौकीचे हवालदार अशोक गिरी हे करीत आहेत.

 
Top