नळदुर्ग : येथील नानीमॉं दर्ग्यामध्ये गैरप्रकार करणा-यांनी एकास जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडल्याने याप्रकरणी चॉंद अब्बासअली शेख यानी जिल्हा पोलीस प्रमुख याना तक्रार दिली आहे.
नानीमॉं दर्गाहमध्ये गैरकारभार चालत असून वक्फ मंडळाची स्थापना करून कारभार सुधारावा, यासाठी चॉंद शेख यानी वक्फ मंडळाकडे दि. 29 मे 2009 रोजी अर्ज केला होता. त्याच्या चौकशीसाठी वक्फ मंडळाच्या अधिका-यानी दि. 24 ऑगस्ट रोजी नानीमॉं दर्गाहामध्ये शेख याना बोलाविले होते. पंचनामा सुरू असताना किरकोळ कारणावरून रिजवान काझी व इतर 20 ते 25 जणांनी मिळून शेख यांना जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. मात्र त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सविस्तर अर्ज पुन्हा दिला. मात्र या प्रकरणाकडे पोलिसानी जाणूनबुजून दूर्लक्ष केले. दर्ग्याचे उत्पन्न दानपेटी असून व लोकांच्या देणग्या आजपर्यंत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात त्याची नोंदणी केली नसून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, याप्रकरणी चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी, अन्यथा सनदशिल मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेख यानी दिला आहे.
नानीमॉं दर्गाहमध्ये गैरकारभार चालत असून वक्फ मंडळाची स्थापना करून कारभार सुधारावा, यासाठी चॉंद शेख यानी वक्फ मंडळाकडे दि. 29 मे 2009 रोजी अर्ज केला होता. त्याच्या चौकशीसाठी वक्फ मंडळाच्या अधिका-यानी दि. 24 ऑगस्ट रोजी नानीमॉं दर्गाहामध्ये शेख याना बोलाविले होते. पंचनामा सुरू असताना किरकोळ कारणावरून रिजवान काझी व इतर 20 ते 25 जणांनी मिळून शेख यांना जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. मात्र त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सविस्तर अर्ज पुन्हा दिला. मात्र या प्रकरणाकडे पोलिसानी जाणूनबुजून दूर्लक्ष केले. दर्ग्याचे उत्पन्न दानपेटी असून व लोकांच्या देणग्या आजपर्यंत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात त्याची नोंदणी केली नसून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, याप्रकरणी चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी, अन्यथा सनदशिल मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेख यानी दिला आहे.