सोलापूर :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, समाजकंटक व गुडप्रवृत्तीचे इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे म्हणून मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पराग सोमन यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (3) कलमान्वये पोलीस आयुक्तालय हद्द वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत दिनांक 29 ऑक्टोबर 2012 रोजी 18.00 वाजले पासून ते 13 ऑक्टोबर 2012 रोजीच्या 18.00 वाजेपर्यंत पांच किंवा पांचाहून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घातली आहे
असा आदेश जारी केला आहे. पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे. अशा यात्रास्थळे व तत्सम प्रकरणापुरता लागू होणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणा-या यंत्रणांना लागू होणार नाही.
* जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन रद्द
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात नोव्हेंबर 2012 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली असल्याने दिनांक 5 नोव्हेंबर 2012 रोजीचा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमन यांनी कळविले आहे.
