मुंबई -: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचे पानिपत झाले. इंग्लंडने
भारतावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळविला. भारतीय
फिरकीपटुंकडून चमत्काराची अपेक्षा करण्यात येत होती. परंतु, तसे
घडले नाही. इंग्लंडच्या सलामीवीरांनी विजयासाठी आवश्यक 57 धावा
केवळ 9.4 षटकांमध्येच काढल्या. कर्णधार एलिस्टर कुक 18 तर निक
कॉम्प्टन 30 धावांवर नाबाद होते.