सोलापूर :- जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पराग सोमण यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (1) कलमान्वये पोलीस आयुक्तालय हद्द वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत दिनांक 15 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 08.00  वाजले पासून ते  दि. 30 डिसेंबर 2012 च्या सायंकाळी 08.00 वाजेपर्यंत आदेश जारी केला आहे.
    या कलमान्वये शस्त्रे, सोटे, मलवारी, भाले, दंडे, सुरे, काठी, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, आणणे, दगड अगर त्यासारख्या वस्तू, शस्त्रे हाताळणे अगर त्यांचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती किंवा त्याची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे या बाबीस प्रतिबंध जाहिर केला आहे. असभय हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नितीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामूळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल अशी सोंगे, चिन्हे तयार करुन त्याचा प्रसार करणे यासही या कलमान्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये बजावताना वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी दिलेल्या पूर्व परवानगीस लागू होणार नाही.
 
* सोलापूर जिल्ह्यात 37 (3) कलम जारी 
सोलापूर :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, समाजकंटक व गुडप्रवृत्तीचे इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे म्हणून मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पराग सोमन यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (3) कलमान्वये पोलीस आयुक्तालय हद्द वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत दिनांक 15 डिसेंबर 2012 रोजी 08.00  वाजले पासून ते  दि. 30 डिसेंबर 2012 च्या 08.00 वाजेपर्यंत पांच किंवा पांचाहून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घातली आहे
    असा आदेश जारी केला आहे. तसेच ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे. अशा यात्रास्थळे व तत्सम प्रकरणापुरता लागू होणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज  बजावणा-या यंत्रणांना लागू होणार नाही.
               
* बीज भांडवल सुधारित योजना लागू 
सोलापूर  :-  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मातंग समाज व त्या समाजाच्या 12 पोटजातीतील आर्थिक दूर्बल घटकांकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यात बीजभांडवल योजने अंतर्गत प्रकल्प मार्यादा रु. 7 लाख, महामंडळाचा 45 टक्के सहभाग (रु. दहा हजार अनुदानास), लाभर्थी सहभाग पाच टक्के, बँकेचे कर्ज पाच टक्के या सुधारीत योजना चालु करण्यात आल्या आहेत.
    सुधारीत प्रकल्प मर्यादेप्रमाणे योजना राबविताना शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्ती कायम राहतील.
 
Top