उस्मानाबाद -: जिल्ह्यात  दि. 30 डिसेंबर ते 13 जानेवारी, 2013 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे  अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी कळविले आहे.
        या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तिंना शस्त्र, काठ्या, लाठ्या, बंदुका, तलवारी, चाकू, रिव्हॉवर आदि जवळ बाळगता येणार नाही, शरीरास इजा करण्यास कारणीभूत ठरतील किंवा सहज बाळगता येतील अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाही, कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके जवळ बाळगता, ठेवता येणार नाही ,किंवा वाहून नेता येणार नाही. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही. सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा. वस्तु जवळ बाळगता येणार नाही. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
       तसेच उस्मानाबाद जिल्हयात कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास किंवा सभा घेण्यास, मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय कामावरील कोणतेही अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम यांना हे आदेश लागू राहणार नाहीत.
       या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधितानी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.  हे आदेश दि. 30 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि 13 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
 
Top