नळदुर्ग -: श्री खंडोबा यात्रेच्‍या इतिहासामध्‍ये कधी नव्‍हे ते यंदाच्‍या वर्षी खंडोबा यात्रेत सोमवार पहाटे विजेच्‍या धक्‍क्‍याने झालेल्‍या दुर्घटनेत दोघा भाविकाना आपले प्राण गमवावे लागले. शांततेत व सुरळीत पार पडण्‍यासाठी प्रसिध्‍द असलेल्‍या मैलारपूर खंडोबा यात्रेला या दुर्घटनेमुळे गालबोट लागल्‍याने आपणास मनस्‍वी दुःख झाले आहे. यापुर्वी कसलीही दुर्घटना घडली नाही, असे सांगून पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी 'तुळजापूर लाईव्‍ह' शी बोलताना हळहळ व्‍यक्‍त केली.
 
Top