उस्मानाबाद :- 'लोकमंगल' प्रतिष्ठानच्यावतीने उस्‍मानाबादेत सामुदायिक विवाह सोहळ्यात ६१ जोडपी विवाहबध्द झाली.
        'लोकमंगल'चे संस्‍थापक अध्यक्ष तथा माजी खासदार सुभाष देशमुख व कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांच्या पुढाकाराने उस्‍मानाबाद पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६.३0 वाजता गोरज मुहूर्तावर हजारो वर्‍हाडींच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. यावेळी वर्‍हाडींच्या गर्दीने पोलिस मुख्यालयाचे मैदान खचाखच भरून गेले होते. अक्षदा पडण्यापूर्वी नवरदेवांची अँटोरिक्षातून वरात काढण्यात आली.
      या सोहळ्यास माजी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, नगराध्यक्षा सरस्वती घोणे, उपनगराध्यक्षअमित शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्षअँड.मिलिंद पाटील, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, धनंजय शिंगाडे, बंटी मंजुळे, विश्‍वासराव शिंदे, जनता बँकेचे ब्रिजलाल मोदाणी, 'लोकमंगल' प्रतिष्ठानचे उस्मानाबादचे अध्यक्षज्ञानेश्‍वर माऊली यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकमंगल समुहाचे सर्वसदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 
Top