बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: काव्‍य संग्रहासाठी कवी कालिदास मंडळाच्‍यावतीने देण्‍यात येणा-या मेघदूत पुरस्‍कारासाठी कवितासंग्रह पाठविण्‍याचे आवाहन अध्‍यक्षा सौ. सुमन चंद्रशेखर यांनी केले आहे.
    मागील वीस वर्षापासून कवितेसाठीचा कालिदास महोत्‍सव आयोजित केला जातो. यावर्षी दि. 14 जुलै रोजी एकविसावा कालिदास महोत्‍सव होत आहे. मेघदुत पुरस्‍कारासाठी आपल्‍या कवितासंग्रहाच्‍या दोन प्रती पाठवणे आवश्‍यक आहे. कवितासंग्रहाचे प्रकाश जानेवारी ते डिसेंबर 2012 दरम्‍यान झालेले असावे. या पुरस्‍कारासाठी शाल, श्रीफळ, सन्‍मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह व रोख रक्‍कम दोन हजार असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. दगडू बळी मस्‍तूद यांच्‍या स्‍मरणार्थ डॉ. कृष्‍णा मस्‍तूद यांच्‍यावतीने हा पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. पुरस्‍कारासाठी सहभाग कवीनी दि. 20 जूनपर्यंत कवितासंग्रहाच्‍या दोन प्रती अध्‍यक्षा सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर, 1550/54, सुभाष नगर, बार्शी, जि. सोलापूर (मो. 9545054937) या पत्‍त्‍यावर  पाठवावे.
 
Top