बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तहसिलच्या भरारी पथकाने शहरातील वाळू उतरत असलेल्या मालट्रकची तपासणी करताना चालकाकडे तारखेत खाडाखोड केलेली पावती आढळल्याने वाहन जप्त चालकास बार्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बार्शी येथील लोखंड गल्ली शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सदरच्या वाळूच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी चालक लक्ष्मण अभिमान कदम (रा. उपळाई खुर्द, ता. माढा) याने दाखविलेल्या वाहतुक परवान्यामध्ये खाडाखोड आढळल्याने सदरच्या चार ब्रास वाळूसह वाहन क्रमांक एम.एच 45 / 1080 हा ट्रक पंचनामा करुन बार्शी पोलिसांच्या हवाली करण्यात आला. यामध्ये मोहोळ येथील गीरी गावाहून वाळू आणल्याचे चौकशीत निष्पण्ण झाले. ट्रकचालक कदम व मालक अजित पांडुरंग अनभुले यांनी संगनमताने दस्ताऐवजात खाडाखोड करुन बेकायदा वाळू वाहतूक करुन त्याची विल्हेवाट लावताना आढळल्याची तक्रार बार्शीचे तलाठी धोंडीराम दत्तु राऊत यांनी दिल्यावरुन बार्शी पोलिसांत भा.दं.वि. 379, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळ या करीत आहेत.
दरम्यान, दुपारी चारपासून पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या कर्मचा-याना राजकीय नेत्यांचे जसजसे फोन येत होते, तसतसे तक्रार देण्यापासून काढता पाय घेत घेतला. सदरच्या बेकायदा वाळू माफियाला सोडून देण्यासाठी काही मध्यस्तांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तहसिल कर्मचा-याला कोप-यात नेऊन कानात काहीतरी फायदयाच्या गोष्टी सांगितल्या. सदरचा प्रकार दुपारी चार पासून रात्री साडे अकरा पर्यंत सुरुच राहिला. त्यानंतर सदरच्या आरोपीला व जप्त केलेल्या वाळू साठ्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून द्यावे, असे कर्मचारी राऊत यांनी सांगितल्यावर पोलिस निरीक्षक एस.आय. चाऊस यांनी त्यांना कायदेशीर भाषेत समज दिली. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण नसेल अथवा तुम्ही तुमच्या नोकरीशी इमानी नसला तरी आम्हाला आमचे कर्तव्य महत्त्वाचे वाटते, असे अप्रत्यक्ष सांगून त्याच्यावर कायदयाने कारवाई केली जाईल व न्यायालयासमोर हजर करण्यात येई, असे सांगत अखेर त्या चालक व मालकांच्या विरूद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
शासनाची फसवणूक करुन वर्षानुवर्षे वाळूचा उपसा सुरु असून वाळू माफियाविरूद्ध कारवाई करणा-यांच्या जीवावर उठत आहेत. अधूनमधून कारवाई होत असल्याने व तक्रारींचे प्रमाण वाढल्याने वाळू माफियांनी वाळूचे भाव गगनाला नेले आहेत. वरपासून खालीपर्यंत दलालांची साखळी असल्याने त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचत नसल्याने त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अनेकवेळा त्यांना मोकळे सोडण्यात येत आहे. फुकटच्या वाळू उपशावर वाळू माफिया कोट्यावधी रुपये गोळा करत आहेत तर अनेकांची बांधकामाची गरज असल्याने गरजूवंत डोळे झाकून पैसे मोजत आहेत.
बार्शी येथील लोखंड गल्ली शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सदरच्या वाळूच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी चालक लक्ष्मण अभिमान कदम (रा. उपळाई खुर्द, ता. माढा) याने दाखविलेल्या वाहतुक परवान्यामध्ये खाडाखोड आढळल्याने सदरच्या चार ब्रास वाळूसह वाहन क्रमांक एम.एच 45 / 1080 हा ट्रक पंचनामा करुन बार्शी पोलिसांच्या हवाली करण्यात आला. यामध्ये मोहोळ येथील गीरी गावाहून वाळू आणल्याचे चौकशीत निष्पण्ण झाले. ट्रकचालक कदम व मालक अजित पांडुरंग अनभुले यांनी संगनमताने दस्ताऐवजात खाडाखोड करुन बेकायदा वाळू वाहतूक करुन त्याची विल्हेवाट लावताना आढळल्याची तक्रार बार्शीचे तलाठी धोंडीराम दत्तु राऊत यांनी दिल्यावरुन बार्शी पोलिसांत भा.दं.वि. 379, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळ या करीत आहेत.
दरम्यान, दुपारी चारपासून पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या कर्मचा-याना राजकीय नेत्यांचे जसजसे फोन येत होते, तसतसे तक्रार देण्यापासून काढता पाय घेत घेतला. सदरच्या बेकायदा वाळू माफियाला सोडून देण्यासाठी काही मध्यस्तांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तहसिल कर्मचा-याला कोप-यात नेऊन कानात काहीतरी फायदयाच्या गोष्टी सांगितल्या. सदरचा प्रकार दुपारी चार पासून रात्री साडे अकरा पर्यंत सुरुच राहिला. त्यानंतर सदरच्या आरोपीला व जप्त केलेल्या वाळू साठ्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून द्यावे, असे कर्मचारी राऊत यांनी सांगितल्यावर पोलिस निरीक्षक एस.आय. चाऊस यांनी त्यांना कायदेशीर भाषेत समज दिली. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण नसेल अथवा तुम्ही तुमच्या नोकरीशी इमानी नसला तरी आम्हाला आमचे कर्तव्य महत्त्वाचे वाटते, असे अप्रत्यक्ष सांगून त्याच्यावर कायदयाने कारवाई केली जाईल व न्यायालयासमोर हजर करण्यात येई, असे सांगत अखेर त्या चालक व मालकांच्या विरूद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
शासनाची फसवणूक करुन वर्षानुवर्षे वाळूचा उपसा सुरु असून वाळू माफियाविरूद्ध कारवाई करणा-यांच्या जीवावर उठत आहेत. अधूनमधून कारवाई होत असल्याने व तक्रारींचे प्रमाण वाढल्याने वाळू माफियांनी वाळूचे भाव गगनाला नेले आहेत. वरपासून खालीपर्यंत दलालांची साखळी असल्याने त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचत नसल्याने त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अनेकवेळा त्यांना मोकळे सोडण्यात येत आहे. फुकटच्या वाळू उपशावर वाळू माफिया कोट्यावधी रुपये गोळा करत आहेत तर अनेकांची बांधकामाची गरज असल्याने गरजूवंत डोळे झाकून पैसे मोजत आहेत.