पुणे - श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीचा संपूर्ण परिसर विठुरायाच्या गजराने दुमदुमत असून राज्यभरातून लक्षावधी वारकर्‍यांचे आगमन येथे झाले आहे. आज (शनिवार) देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून पालखी सोहळ्याचा मंगलमय प्रवास सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ उद्या (30 जून) रोजी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथून होणार आहे. पालखी सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
Top